10,000+ मोटिवेशन स्टेटस इन मराठी | motivation status in marathi

Motivation status in marathi

motivational quotes ,quotes marathi,quotes in marathi ,life quotes in marathi , good marathi thoughts quotes on life in marathi , marathi thoughts , status on life in, life status in marathi

motivation status in marathi

1.ज्याला मन जिंकता आलं त्याने माणूस जिंकला आणि ज्याने माणूस जिंकला त्याने संपूर्ण जग जिंकले …

2.shivaji maharaj जीवन चरित्रातून एक गोष्ट घ्यायची झाली तर मोठी स्वप्न बघण्याची असामान्य ताकद घ्या . स्वप्न सत्यात उतरवण्याची प्रचंड हिंमत आणि धमक घ्या … #motivation status in Marathi

Motivation status in marathi

3.ज्या माऊलीनं आपल्या लेकरांच्या काळजामध्ये स्वराज्याची ज्योत निर्माण केली … माणसाला आपल्या अस्मिता आणि अस्तित्वाची जाणीव करून दिली … स्वराज्य रक्षणासाठी आपलं मातृत्व पणाला लावलं अशा जगाच्या पाठीवर सर्वात आदर्श आई … Motivation marathi

संकट , अपयश , अडचणी या एकट्या येत नसतात . त्याबरोबर त्या संधी घेऊन येत असतात . सकारात्मक विचारांची माणसं या संकटात संधी शोधून सोनं करतात तर नकारात्मक विचारांची माणसं ही संकटाच्या गर्तेत मार्ग हरवून बसतात .

शिवाजी महा जितकी संकटे आली त्यांनी त्यात ताकदीने प्रचंड मोठी संधी शोधली आणि महानतेच्या दिशेने एक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकले . motivation marathi

Motivational quotes marathi

# Motivation marathi ज्याच्या आयुष्याला ध्येय आहे त्याच्या जीवनातील प्रत्येक क्षणाला अर्थ प्राप्त होतो . त्याचे पडणारे प्रत्येक पाऊल ध्येयाच्या दिशेने असते . आपला जन्म काहीतरी असामान्य घडवण्यासाठी झाला आहे असं ज्याला वाटतं ते आपल्या वैयक्तिक सामाजिक , व्यावसायिक जीवनात भव्य – दिव्य बदल करू शकतात

जर तुम्हाला तुमच्या क्षेत्रात राजा व्हायचे असेल तर आतापर्यंत कोणी केला नाही असा विचार करा … आतापर्यंत कोणी बघितले नाही असे स्वप्न बघा …

आतापर्यंत कोणी केलं नाही असं काम करा … आतापर्यंत कोणी गेले नाही अशा वाटेवर जा . कारण दुसऱ्यांनी निर्माण केलेल्या वाटेवर सर्वच चालतात ; परंतु जी माणसं स्वतःच्या वाटा स्वतः निर्माण करतात त्यांचाच इतिहास घडतो .

जगातील सर्व महान माणसांच्या यशाचं गमक एका गोष्टीत आहे ती गोष्ट म्हणजे मनाची खुणगाठ बांधुन ठेवा . जीवनात जर आपल्याला पुढे जायचं असेल तर शिक्षण आडवं येत नाही , गरिबी आडवी येत नाही , वय आडवं येत नाही , जात आडवी येत नाही , की धर्म आडवा येत नाही . मग काय आडवे येत तर … आडवे येतात ते नकारात्मक विचार आणि उत्तुंग यश मिळवायचं असेल तर आपल्या मनातील नकारात्मक विचारांना आडवं करा . सकारात्मक विचारांना उभ करा , हेच खरे शिवसूत्र आहे .

असाध्य ते साध्य करी सायास कारण अभ्यास तुका म्हणे ‘ या जगाच्या पाठीवर अशक्य असे काही नाही . .. अशक्य ते शक्य … असंभव ते संभव, असाध्य ते साध्य करण्याची ताकद प्रयत्नांमध्ये आहे . ज्याने मनामध्ये काहीतरी करण्याचा दृढनिश्चय केला अशा माणसाला जगामधली कुठलीही ताकद रोखू शकत नाही . आणि ज्याने मनामध्ये काहीच न करायचे ठरवले त्याला जगातील कुठलीही ताकद उठवू शकत नाही .

शिवाजी महाराज हे भारतीय व्यवस्थापनाचे खरे जनक आहेत उच्च दर्जाचे व्यवस्थापन कसं असावं हा शिवरायांच्या व्यवस्थापनाचा अभ्यास आज जगाच्या पाठीवर केला जातोय कमीत – कमी वेळेत कमीत – कमी माणसांमध्ये जास्तीत – जास्त पराक्रम करून शिवाजी महाराजांनी जगाला अचंबित केले .

जीवनात गरिबी दूर करायची असेल तर विचारांची गरिबी दूर करून श्रीमंत विचारांचे मालक बना . ज्या दिवशी विचारांची श्रीमंती येईल त्या दिवशी पैशांनी श्रीमंती यायला वेळ लागणार नाही . जगामध्ये पैसे कमवायला पैसे लागत नाही , तर पैसे कमावण्यासाठी लागते ती अक्कल !

भगवंताने आपल्याला जन्माला घातले . आपण कुठल्या जाती धर्मात जन्माला यावे हे आपल्या हातात नसते ; परंतु आपण कुठल्या धर्मात जन्माला आलो याने काही फरक पडत नाही . आपण कुठल्या जातीत जन्माला आलो यानेही काही फरक पडत नाही . आपण कसे दिसतो यानेही काही फरक पडत नाही . आपण मानवी जीवनामध्ये येऊन काय कार्य करतो याने मात्र फार नक्कीच फरक पडतो . कारण माणूस त्याच्या जाती – धर्माने नव्हे तर त्याच्या कर्माने मोठा होतो .

जोखीम जितकी मोठी यश देखील तितकच मोठं असतं . मैदानात उतरण्याचा धोका पत्करा . ज्या माणसाच्या मनामध्ये असलेल्या भीतीचे राज्य नष्ट होऊन निर्भयतेचे राज्य येईल त्या दिवशी तो माणूस जगावर राज्य केल्याशिवाय राहणार नाही . मराठी माणसामध्ये क्षमता आहे … मराठी माणसामध्ये ताकद आहे … मराठी माणसामध्ये दम आहे … मराठी माणूस मागे का राहतो कारण तो धाडस करत नाही … मुश्कील नही है कुछ दुनिया मैं । तू जरा हिम्मत तो कर । ख्वाब बदलेंगे हकीगत में । तू जरा कोशिश तो कर ॥

आत्तापर्यंत आम्ही जगाला खुश करण्यात आपला वेळ वाया घालवत आलो . जगाला इम्प्रेस करण्यात स्वतःचा वेळ वाया घालवण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आयुष्यात घेऊन आपल्या कार्य कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करा . जग अपोआप दखल घेतल्याशिवाय राहणार नाही .

Great शिवाजी महाराजांची आई तुळजाभवानी मातेवर निस्सीम श्रद्धा होती . स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात रक्ताचा अभिषेक करून शपथ घेतली स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा ‘ असं शिवाजी महाराज म्हणत होते . ‘ जगदंब जगदंब ‘ हे नामस्मरण महाराजांच्या मुखात नेहमी असायचे . महाराज धार्मिक होते , पण अंधश्रद्धाळू मात्र नव्हते … महाराजांनी अमावास्येला युद्ध केली सिंधुबंदी झुगारून आरमार उभे केले . ज्या काळात समुद्रात काही किलोमीटर अंतरावर जाणे पाप मानले जायचे त्या काळात महाराजांचे आरमार मस्कदपर्यंत गेली . जर आपण सर्वांनी अंधश्रद्धा झुगारून जर विज्ञानाची कास धरली तर भारत महासत्ता होण्यापासून जगातील कोणतीही ताकद आपल्याला रोखू शकत नाही . कारण ज्या ठिकाणी अंधश्रद्धा आहे त्या ठिकाणी शिवरायांचा भगवा असूच शकत नाही . आणि ज्या ठिकाणी शिवरायांचा भगवा आहे त्या ठिकाणी अंधश्रद्धा असूच शकत नाही .

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र केवळ मराठी माणसासाठी नव्हे , केवळ भारतीय माणसांसाठी नव्हे , तर अखिल मानव जातीसाठी प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक आहे . माणूस कुठल्याही जातीचा असेल , कुठल्याही धर्माचा असेल , कुठल्याही प्रांताचा असेल , कुठल्याही पंथाचा असेल , तो कुठल्याही देशाचा असेल , ज्या दिवशी शिवाजी महाराजांचे खरे विचार तो डोक्यात घेईल त्या दिवशी हे संपूर्ण जग त्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही . हे सामर्थ्य , ही ताकद , ही शक्ती निश्चितच शिवचरित्रात आहे

एक असा राजा जो रयतेच्या कल्याणासाठी जगला … एक महान योद्धा जो अन्याय विरुद्ध उभा ठाकला … एक असामान्य नेता ज्याने वर्षानुवर्षाचे गुलामीच जीवन नाकारलं … एक अलौकीक व्यक्तिमत्त्व ज्याने सामान्य रयतेतील असामान्यत्व जागरुक केलं … एक महान व्यक्तिमत्त्व ज्याने माणसांची मन जिंकली , माणूस जिंकला आणि जन्म दिला जगातील सर्वात महान साम्राज्य असलेल्या हिंदवी स्वराज्याला ...

एक वेळेस तुम्ही धन गमावले तर काहीच नाही गमावले . एक वेळेस तुम्ही शरीर गमावले तर थोडं फार गमावले . परंतु तुम्ही चारित्र्य गमावले तर तुमच्याकडे गमावण्यासारखे काहीच उरले नाही ,

इराणचं राज्य शहाबादचं होतं , अफगानिस्ताणचे राज्य हे आली दुरानीचे होते , अहमदनगरचे राज्य निजामशहाचे होतं , विजापूरचे राज्य हे आदिलशहाचे होते , गोवळकोंड्याचे राज्य हे कुतुबशहाचे होते . पण शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य कुठल्या बादशहा , सुलतान किंवा सम्राटाचे नव्हते . ते रयतेचे राज्य होते . जिथे रयतेचे राज्य आहे तिथे माणसं जगायला आणि मरायला मागे – पुढे पाहत नाहीत

motivation status in marathi,motivation status in marathi,motivation status in marathi,motivation status in marathi,motivation status in marathi,motivation status in marathi,motivation status in marathi,motivation status in marathi,motivation status in marathi,motivation status in marathi

New 67+ Birthday Wishes for Mom From Daughter in Marathi

birthday wishes mom marathi 1

Birthday Wishes for Mom From Daughter in Marathi: आईला मुलीकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आयुष्यातील प्रथम गुरूला, आयुष्यातील माया, करुणा, प्रेम, … Read more

[Latest 44+] छोटे भाई के लिए जन्मदिन की शुभकामनाएं | Birthday Wishes For Little Brother in Hindi.

birthday wishes for little brother in hindi

birthday wishes for little brother in hindi, chote bhai ko birthday wish in hindi: छोटा भाई राम के भाई लक्ष्मण … Read more